संभाजीनगर (प्रतिनिधी): टोक्यो ओलंपिकमध्ये ७ ऑगस्टला भारताच्या नीरज चोप्रा ने भालाफेक या ॲथलेटिक्सच्य क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. नीरज चोप्राची ही कामगिरी सर्व उदयनूक खेळाडूंना प्रेरणा देत राहावं
याकरिता भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या वतीने देशभर ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्या ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, उपप्राचार्य डॉ.माधव गायकवाड, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा निकाल
पुरुष खुला गट- प्रथम: शाहरुख शेख, द्वितीय: रवींद्र थोरे, तृतीय: तुषार शिंदे. महिला खुला गट- प्रथम: चंचल देवकर, द्वितीय: दिव्या इंगळे, तृतीय: दिशा जोशी. वीस वर्षा आतील मुले प्रथम:- आदित्य नरवडे, द्वितीय:- अभिषेक गदादे, तृतीय:- संदेश फोलाने. वीस वर्षा आतील मुली, प्रथम :- वैशाली लिंगायत, द्वितीय:- योगिता कदम, तृतीय :- खुशी फत्तेलष्कर.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲथलेटिक्सचे तांत्रिक समितीचे प्रमुख डॉ. दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रबोधिनीच्य प्राचार्य पुनम नवगिरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, डॉ.सचिन देशमुख, डॉ.राम जाधव, डॉ.सुहास यादव, प्रा.मधुकर वाकळे, भरत रेडी, प्रा.राहुल अहिरे आणि तुषार खेडकर यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण स्पर्धेचे समालोचन प्रा. अमृत बिराडे यांनी केले.