• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा

by pravin
January 16, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

१४ जानेवारी रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने गमावली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर आपली निर्णय जाहीर केला आहे. पण विराटने कर्णधारपद सोडणार आहे असे सांगितलेली पहिली व्यक्ती कोण होती आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिली हे देखील उघड झाले आहे.

 

 

 

 

 

 

माध्यमांच्या वृत्तानुसार, कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी विराट कोहलीने सर्वप्रथम भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली होती. शुक्रवारी रात्रीच विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या निर्णयाची माहिती दिली. राहुल द्रविडला आपला निर्णय सांगितल्यानंतर विराटने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत माहिती दिली होती ,आणि त्याचवेळी त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता.

 

 

विराट कोहलीने १५ जानेवारी २०२२ रोजी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी १५ जानेवारीच्या दिवशी विराट कोहलीने भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता आणि आता याच दिवशी त्याने भारतीय संघाचे कर्णधार पद सोडले आहे. गेले चार महिने विराट कोहलीसाठी फारसा चांगला काळ गेला नाही. यादरम्यान त्याने चार संघांचे कर्णधारपद गमावले. विराट कोहलीने १६ सप्टेंबर २०२१ रोजी विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती.

 

 

त्यानंतर २० सप्टेंबर २०२१ रोजी विराटने इंडियन प्रीमियर लीग २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आठ डिसेंबर २०२१ रोजी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आणि संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. आता १४ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने १५ जानेवारी २०२२ रोजी ट्विटरवर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीसाठी १५ जानेवारी ही तारीख भूतकाळातही संस्मरणीय राहिली आहे.

 

 

कोहलीने १५ जानेवारी २०१७ रोजी पुण्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

Tags: caption leaveCricketVirat Kohli
ShareTweetSend
Next Post
सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.