औरंगाबाद (प्रतिनिधी): बदनामी आणि भ्रष्टाचार यांच्या दलदलीत असलेल्या औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे जबरदस्त धक्का बसला आहे.औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांची केलेली स्वैच्छिक सेवा नियुक्ती राज्याचे कर्तव्य दक्ष क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी रद्दबातल ठरवली आहे.
याबाबत “स्पोर्ट्स पॅनोरमा ” पोर्टलने नावंदे यांनी केलेल्या नियुक्ती बाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते .
तसेच ही नियुक्ती कशी काय वैध ठरू शकते, अशी विचारणा केली होती.
बकोरिया यांनी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांनी मोफतपणे आपली सेवा देण्यासाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली विचारणा योग्य असली तरी अशा नियुक्तीचे कोणतेही अधिकार नावंदे यांना नाहीत, आपण कशाच्या आधारावर त्यांना नियुक्ती पत्र दिले, हे सारे नियमांत बसणारे नसून दिंडे यांच्या निवडीबाबतचा अहवाल पुणे येथील कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गंडांतर , नवीन नियुक्त्या
औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची कमतरता आहे, याची तातडीने दखल घेतली जाईल, वादग्रस्त अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, आवश्यकतेनुसार नवीन नियुक्त्या केल्या जातील- ओमप्रकाश बकोरिया (क्रीडा आयुक्त, राज्य शासन)