• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’

by pravin
December 7, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

विराट कोहली याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेचसे ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. सोमवार रोजीही (०६ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड  यांच्यात झालेल्या मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय प्राप्त केला. यानंतर विराटवर कौतुकांचा वर्षाव करताना माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण याने त्याला भारतातील सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार संबोधले आहे.

इरफानच्या मते, कसोटी संघाच्या नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, एमएस धोनी यांनाही मागे सोडले आहे.

इरफानने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘विराटच्या नेतृत्त्वाखालील संघाने, सोमवारी वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडला ३७२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केल्यानंतर कसोटी मालिकेतही बाजी मारली आहे. जसे की, मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आताही सांगतोय, विराट भारतातील आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार आहे. तो ५९.०९ च्या विजयी सरासरीसह अव्वलस्थानावर आहे.’

As I have said earlier and saying it again @imVkohli is the best Test Captain India have ever had! He's at the top with the win percentage of 59.09% and the second spot is at 45%.

— Irfan Pathan (@IrfanPathan) December 6, 2021

विराट कोहली आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी विजयासह विराटच्या शिरपेचात अजून एका विक्रमाची नोंद झाली. तो भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. याबाबतीत तो माजी कर्णधार एमएस धोनी याच्यापेक्षा खूप पुढे आहे.

मुंबई कसोटी हा विराटचा कर्णधार म्हणून ६६ वा सामना होता. या ६६ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना त्याने ३९ सामने जिंकले आहेत तर १६ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच उर्वरित ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. यासह त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताची विजयी सरासरी ५९.०९ इतकी झाली आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ६० पैकी फक्त २७ कसोटी सामने जिंकले होते.

अशाप्रकारे विराटने भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे आणि त्याची विजयी सरासरीसुद्धा ५० टक्केपेक्षा जास्त राहिली आहे. तो भारताचा असा पहिला कर्णधार आहे, ज्याने १० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले अन् त्याची विजयी सरासरी ५० टक्केंपेक्षा जास्त आहे.

ShareTweetSend
Next Post
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दाखल होणार चौकशी समिती

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दाखल होणार चौकशी समिती

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.