नवी दिल्ली –मोहालीत ४ मार्चपासून सुरू होणारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ही विराट कोहलीच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी आहे.रोहित शर्मा प्रथमच भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होत असताना मधल्या फळीतही नवे बदल अपेक्षित आहेत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जागी शुभमन गिल आणि हनुमा विहारी हे पर्याय श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आजमावले जाण्याची शक्यता आहे.
पुजारा आणि रहाणे यांची श्रीलंकेविरुद्धच्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या एक अशा एकूण तीन कसोटी सामन्यांसाठी निवड केली जाणार नाही. केपटाऊनला भारतीय संघ अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर संघात दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गिल आणि विहारी यांच्याशिवाय श्रेयस अय्यर असे तीन पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड कोणती रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.