• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सुनील गावसकरांसाठी भारताचे ‘ते’ तीन खेळाडू ठरले स्पेशल!

by pravin
January 27, 2022
in क्रिकेट
सुनील गावसकरांसाठी भारताचे ‘ते’ तीन खेळाडू ठरले स्पेशल!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेमध्ये देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे . एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ पत्करणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यामते तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी तीन खेळाडूंची कामगिरी उंचावली असून त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यासंदर्भात त्यांनी तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या बदलांविषयी मत मांडलं आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं वेंकटेश अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं होतं. त्यासोबत भुवनेश्वर कुमारऐवजी दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर ऐवजी प्रसिध कृष्णाला संघात स्थान देण्यात आलं होतं. हे तीन बदल करून देखील भारताला तिसऱ्या सामन्यात अवघ्या काही धावा विजयासाठी कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका होत असताना सुनील गावसकर यांनी यातूनही भारतासाठी घडलेल्या सकारात्मक गोष्टीवर भूमिका मांडली आहे.

भारतीय संघात अंतिम सामन्यासाठी स्थान मिळालेल्या या तिघांनी आपल्या कामगिरीतून नक्कीच आपली दावेदारी सिद्ध केली आहे,असं गावसकर म्हणाले आहेत. हा तिसरा सामना मालिकेच्या दृष्टीने एक औपचारिकताच होती हे खरं आहे. पण त्यांच्यासाठी ते तसं नव्हतं. कारण त्यांच्यासाठी ही एक संधी होती. दक्षिण आफ्रिका निर्भेळ यशासाठी प्रयत्न करणार हे त्या तिघांना माहिती होतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव होता. पण त्यातूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं गावसकर म्हणाले.

त्यांना असा विश्वास द्या की त्यांना आता जास्तीत जास्त संधी मिळणार आहेत. आता त्या तिघांची जागा संघाबाहेर नसून संघामध्ये आहे असं त्यांना वाटू द्या, असं देखील सुनील गावसकरांनी नमूद केलं आहे.

Tags: CricketFor Sunil-Gavaskar-Indiathree players
ShareTweetSend
Next Post
शोएब अख्तर म्हणतो...'मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा !

शोएब अख्तर म्हणतो...'मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा !

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.