औरंगाबद:(प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे खेळाची मैदाने, व्यायामाचे ठिकाणे जॉगिंग पार्क आणि गार्डन बंद करण्यात आलेली आहे. मात्र त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि खेळाडूंना सराव करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही सर्व ठिकाने सुरू करावीत असे निवेद माननीय मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांच्या मार्फत औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले की कोरोनाच्या (कोवीड १९) आजारात लसीकरण, विलगीकरण, मास्क सॅनिटायझर आणि उपचारासह प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते. खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणे, जॉगिंग पार्क आणि गार्डन मध्ये शारीरिक अंतर ठेवून केलेल्या हालचालीमुळे करोना संसर्गाचा धोका उद्भवत नाहीत. या उलट पुरेसा व्यायाम आणि खेळ यामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती व सकारात्मक मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.
त्याशिवाय आगामी काळात स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यात सहभागी होऊन यश संपादन करण्याकरिता खेळाडूंना सराव अत्यंत महत्वाचा आहे. हा सराव नसेल तर ते अपेक्षित यश मिळू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची कित्येक वर्षांची मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज हजारो खेळाडू घरामध्ये खेलावाचून बनधिस्त आहेत. त्यांना सरावाची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर खडक निर्बंधांचे आदेशामुळे क्रीडा प्रशिक्षकांचे उपजीविकेचे साधन देखील नाहीसे झाले असून, त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन ही सर्व ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंसाठी सुरू करावी, अशी मागणी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशन तर्फे करण्यात आली. यावेळी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद केंद्रे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, अभय देशमुख, महेश इंदापुरे, अनिल मिरकर, अजय दाभाडे, सुमित खरात, निखिल पवार यांची प्रतिनिधिक उपस्थिती होती.