• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 13, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पराभवानंतरचा पंचनामा!

by pravin
January 16, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
पराभवानंतरचा पंचनामा!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या बलाढय़ संघांना त्यांच्याच भूमीत धूळ चारणाऱ्या भारताचे आफ्रिकन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न ३० वर्षांनंतरही अधुरेच राहिले. या मानहानीकारक पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून अन्य खेळाडूंच्या कामगिरीचाही पंचनामा सुरू आहे.

 

 

 

 

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने सेंच्युरियनची कसोटी सहज जिंकून सरत्या वर्षांला दिमाखात निरोप देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु नव्या वर्षांत कर्णधार डीन एल्गरच्या आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथील कसोटी सामने जिंकत २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. तिन्ही सामन्यांत आफ्रिकेने नाणेफेक गमावली, तर अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे १९९२ पासून आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारताची मालिकाविजयाची प्रतीक्षा कायम आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची तुलना करायची झाल्यास भारतीय संघ आफ्रिकेपेक्षा कौशल्य आणि अनुभवाच्या बाबतीत वरचढ असल्याचे दिसून येते. मात्र तरीही मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात भारताचे रथी-महारथी अपयशी ठरले. या पराभवानंतर काही खेळाडूंच्या संघातील स्थानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला लवकरच कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

 

 

 

भारताच्या पराभवामागील प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांचे अपयश. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीच्या सुमार कामगिरीचा भारताला फटका बसला. वाँडर्स येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकांव्यतिरिक्त रहाणे-पुजारा संपूर्ण मालिकेत चाचपडताना दिसले. पुजाराने गेल्या तीन वर्षांत एकही शतक नोंदवलेले नाही, तर रहाणेने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत अखेरचे शतक साकारले होते. या दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही छाप पाडू न शकल्यामुळे मुंबईकर रहाणेने कसोटी उपकर्णधारपदही गमावले आहे.

त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने या दोन्ही खेळाडूंच्या भवितव्याबाबत बोलण्यास नकार देताना निवड समितीला विचारण्याची सूचना केली. आता श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांसारखे असंख्य पर्याय उपलब्ध असताना रहाणे-पुजारा या दोन्ही ३३ वर्षीय खेळाडूंवर निवड समिती आणखी किती काळ भरवसा ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

 

 

 

Tags: keptaunpanchnamaVirat Kohli
ShareTweetSend
Next Post
हीच योग्य वेळ आहे कसोटी नेतृत्व सोडण्याची ;कोहली

हीच योग्य वेळ आहे कसोटी नेतृत्व सोडण्याची ;कोहली

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे अस्मिता खेलो इंडिया वुमन्स सायकलिंगचे आयोजन

राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा;छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक संघास विजेतेपद

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.