• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात कोहली-पंत खेळणार नाही,

by pravin
February 19, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोलकाता- बीसीसीआयने ( (BCCI) भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि ऋषभ पंतला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) शेवटच्या टी-२० सामन्याआधीच बायो बबलमधून ब्रेक दिला आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपआपल्या घराकडे रवाना झालेत. ते दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सहभागी होणार नाहीत.

 

बीसीसीआयने विराट कोहली आणि ऋषभ पंतला १० दिवसांचा ब्रेक दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच दोघेही श्रीलंके विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. २४ फेब्रुवारीपासून लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिक सुरू होत आहे. यानंतर श्रीलंका आणि भारतात २ सामन्यांची कसोटी मालिका देखील होणार आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत सहभागी होतील. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका कोहलीसाठी १०० वा कसोटी सामना असेल.

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोहली आणि पंत दोघांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सुरुवातीला डाव संभाळला, तर पंतने सामन्याच्या अखेरीस दमदार कामगिरी केली.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ८ धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना १८७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Tags: bbciCaptionsCricketrishabh pantVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.