नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या साखळीत ब गटाच्या सामन्यात भारतीय संघाने हंगेरी आणि मोल्डोव्हालच्या संघाला पराभूत केले. स्लोव्हेनिया विरुद्धचा सामना बरोबरीत सोडला गेला आहे. १६ गुणांसह अजिंक्य राहून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.
माजी विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑलिम्पियाड मध्ये खेळत आहे. यात विदित संतोष गुजराथी, पी हरिकृष्ण, निहाल सरीन, आर प्रज्ञागंधा, कोनेरू हम्पी, डी हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर वैशाली आणि बी सविता श्री असा संघ खेळतो आहे. साखळीत झालेल्या नऊ फेऱ्यांच्या शेवटी भारतीय संघ ७ विजय आणि दोन ड्रॉ सह १६ अंकावर आहे. झालेल्या सातव्या फेरीत भारताने हंगेरीला ४-२ ने पराभूत केले. ज्यात विश्वनाथन आनंद, निहाल सरिन आणि कोनेरू हम्पीच्या यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. तर आर. वैशाली आणि द्रोणावल्ली हरिका यांनी संपले सामने बरोबरीत सोडवले आहेत. मात्र पी हरिकृष्णाला पराभवाचा सामना करावा लागला.आठव्या फेरीत भारताने मोल्दोव्हालच्या संघाला ५-१ च्या मोठ्या फरकाने पराभूत केले. तर नवव्या आणि शेवटच्या फेरीत ३-३ करत बरोबरीत रोखले.
ऑनलाईन पद्धतीने होत असलेली ही स्पर्धा चेन्नई येथून खेळली जात आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे सचिव सचिन सिंग चौहान यांनी या विजयबाबत आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय बुद्धिबळ संघासाठी चांगल्या गोष्टीतींची ही सुरुवात आहे. आमचे ध्येय भारताला बुद्धिब मध्ये जगातील नंबर एकचे राष्ट्र बनवायचे आहे.’ अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना १३ सप्टेंबर रोजी क-गटातील दुसऱ्या संघाशी होणार आहे